"पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही शेतकरी कायद्यांचा विरोध करणार" - अजित नवले

"पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही शेतकरी कायद्यांचा विरोध करणार" - अजित नवले

मुंबई : अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी आजच्या मुंबईतील शेतकरी मोर्चाविषयी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना डॉक्टर अजित नवले यांनी शेतकरी मोर्चाबाबत इत्यंभूत माहिती दिली. 

मुंबईत हजारोंच्या संख्येने शेतकरी दाखल होत होते. आजही काही शेतकरी मुंबईत दाखल होणार आहेत. काल जो गाड्यांचा जथ्था मुंबईत आला. त्यामाध्यमातून तब्बल १५ हजार शेतकरी मुंबईत दाखल झालेत. यासोबतच १०१ इतर संघटनांचे प्रतिनिधी या शेतकरी मार्चमध्ये सहभागी झाली आहेत. आज साधारण ५० हजार शेतकरी मुंबईत जमणार आहेत. त्यानंतर एक सभा घेण्यात येईल, सभेनंतर शेतकऱ्यांचा विशाल मोर्चा हा राजभवनाच्या दिशेने कूच करणार आहे. महाविकास आघाडीतील तीनही राजकीय पक्ष या शेतकरी मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. तीनही पक्षांच्या नेत्यांसोबत आम्ही राजभवनामध्ये जाणार आहोत. पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या वतीने केंद्र सरकारच्या तीनही कायद्यांचा विरोध आणि हमीभाव कायद्याचा आग्रह लावून धरणार आहोत, असं डॉक्टर अजित नवले म्हणालेत. 

राज्य सरकार विरुद्ध केंद्र असं चित्र निर्माण होणार का ? 

राज्य सरकारचे प्रतिनिधी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या आधीही भारत बंदमध्ये तीनही पक्ष सहभागी झाले होते. त्याचबरोबर केंद्र सरकारने केलेल्या कायद्यांचा तीनही पक्षांनी विरोध केलेला आहे. आम्ही ज्यावेळी सरकारला निमंत्रण देण्यास गेलो, तेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोर्चामध्ये सहभागी होण्याचं मान्य केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येण्याचं मान्य केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला, सोबतच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चाला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून भाजप विरद्ध जनता अशी एकजूट महाराष्ट्रात आणि देशात आकाराला येतेय. शेतकऱ्यांच्या बाजूने समाज आणि श्रमिक एकत्रित येतायत ही दिलासादायक बाब आहे, असंही अजित नवले म्हणालेत.

अजित नवलेंनी सांगितलं, शेतकऱ्यांच्या मागण्या काय ? 

  • केंद्राने केलेले तीनही कायदे कॉर्पोरेट धार्जिणे आहेत. शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची बात केली जात असताना स्वातंत्र्य मात्र कॉर्पोरेट कंपन्यांना मिळतंय. 
  • शेतमालाची बाजापेठ ताब्यात घेण्याचा केंद्राचा कावा आहे. केंद्राचा कावा उधळून लावण्यासाठी शेतकरी कायदे स्थगित करण्याची आमची मागणी 
  • आधारभावाची हमी कायदेशीररित्या मिळायला हवी 
  • महाराष्ट्रात वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी केली जावी, देवस्थाने आणि इनाम वर्ग तीनच्या जमिनी शेतकरी कसतायत, त्याही नावावर करण्याची आमची मागणी आहे.
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेची पुन्हा महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी.

mumbai farmers march interview of doctor ajit navale before presenting demands to governor of maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com