Maratha Reservation Protest: आंदोलन संपले, पण नुकसानभरपाईचे काय? मराठा आंदोलनाबाबत न्यायालयाची विचारणा

Mumbai High Court: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली असून आंदोलनही संपले. पण आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली.
High Court
High Courtsakal
Updated on

मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली. जरांगे यांनी आमरण उपोषण सोडले, आंदोलन संपले. पण पाच दिवसांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, अशी विचारणा बुधवारी (ता. ३) उच्च न्यायालयाने केली. सरकारच्या मध्यस्थीने आंदोलन संपल्याची माहिती महाधिवक्ता बीरेंद्र सराफ आणि जरांगेंच्या वतीने वकील सतीश मानेशिंदे आणि व्ही. एम. थोरात यांनी न्यायालयाला दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com