

High Court Crackdown: Show Cause Notice to VVMC Commissioner Prithviraj BP
Sakal
विरार : वसई विरार महानगरपालिकेची अर्थ व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून आता पालिकेकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे राहिले नाहीत.या संदर्भात मुंबई हायकोर्टाने वसई-विरार महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर कठोर शब्दांत ताशेरे ओढत ग्रामपंचायतीमधून महापालिकेत वर्ग झालेल्या २८ कर्मचाऱ्यांच्या पगार थकबाकी प्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. न्यायालयाने ९ मार्च २०२६ रोजी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल महापालिका आयुक्त पृथ्वीराज बद्रीप्रसाद यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अडचणीत आले आहेत.यासोबतच, महापालिकेच्या खर्चावर निर्बंध घालतानाच १० दिवसांच्या आत थकबाकी रक्कम अदा करण्याचे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.