मुंबईची लाईफलाईन पुढच्या आठवड्यात धावणार? सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबईची लाईफलाईन पुढच्या आठवड्यात धावणार? सरकार घेणार मोठा निर्णय

मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. या व्हायरसचा सर्वात जास्त प्रार्दुभाव हा मुंबईत पाहायला मिळतोय. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यातच लोकल सेवाही बंद आहे. मुंबईतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लोकल सेवा हा एकच पर्याय आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबईत पुढच्या आठवड्यापासून लोकल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं केली होती. हा लोकल प्रवास सर्वांसाठी राहणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे प्रवासास मुभा राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.

अनलॉक 1.0 अंतर्गत मुंबईसह राज्यभरात दुकानं आणि खाजगी कार्यालय सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतर आता मुंबईत नागरिकांची पुन्हा गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक जण कामावर जाण्यासाठी बेस्ट बसचा वापर करताहेत. त्यामुळं गर्दी झाल्यास कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यात कोरोनाचा धोका हा गर्दीच्या ठिकाणी अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्राकडे मागणी केली. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला राज्य सरकारनं पत्र लिहिलं होतं. 

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यांना एसटीनं प्रवास करणंही कठिण जात आहे. एसटीपेक्षा रेल्वेनं लवकर कामाच्या ठिकाणी पोहोचणं शक्य होतं. त्यामुळं रेल्वे मंत्रालयानं लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. आम्ही रेल्वे मंत्रालयाच्या संपर्कात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लोकल सेवा सुरु व्हावी म्हणून प्रयत्न करत आहेत. किमान अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी तरी लोकल सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला कळवली आहे.

रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या याबाबत चर्चा सुरू आहे. लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com