मुंबई : लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या 'विशेष गाड्या' बंद कराव्यात

कोरोना पूर्व काळातील सामान्य गाड्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
railway
railwaysakal

मुंबई : कोरोना आणि लाॅकडाऊन काळात धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्या 'विशेष गाड्या' म्हणून धावत आहेत. या गाड्यांना विशेष तिकीट दर आकारला जात आहे. यासह सवलतीच्या दरातील प्रवाशांना कोणत्याही प्रकारचे सवलतीचे तिकिट दिले जात नाही. मागील दीड वर्षांपासून सुरू असलेली लूट थांबविण्यात यावी. सर्वत्र नियमांत शिथिलता येत असल्याने कोरोना पूर्व काळाप्रमाणे गाड्या चालवून तिकिट दर आकारावे, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

मागीलवर्षी कोरोनाच्या सुरूवातीला संपूर्ण भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद केली होती. फक्त यावेळी अत्यावश्यक सामग्रीचा पुरवठा करण्यासाठी मालगाडी, पार्सल गाडी धावत होत्या. त्यानंतर हळूहळू प्रत्येक विभागातून प्रवासी वाहतूक सुरू झाली. मात्र, या गाड्या 'विशेष गाड्या' म्हणून गाडीचा क्रमांक बदलून धावत आहेत. मात्र, या विशेष गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारचे सवलतीचे तिकिट नाही. त्यामुळे त्यांना जादा पैसे मोजून तिकिट खरेदी करावे लागते. तर, इतर प्रवाशांना विशेष गाडीचे जादा दर घेतले जात आहेत. कोरोना काळात नागरिक आर्थिक गर्तेत अडकले असताना, मागील वर्षीपासून रेल्वे जादा पैसे आकारून प्रवाशांची लूट करत आहेत. आता सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. लाॅकडाऊन शिथिल केले जात आहे. त्यामुळे विशेष गाड्यांची सेवा बंद करून सर्वसाधारण नियमित गाड्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली.

railway
IPL 2021: अर्जुन तेंडुलकर एकही सामना न खेळताच भारतात परतणार

सर्वसामान्य प्रवाशांसाठी पॅसेंजर गाडी खूप जवळची आहे. मात्र, पॅसेंजर गाड्या देखील बंद आहेत. त्यामुळे राज्यभरातील नियमित पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात. त्यामुळे व्यापारी, नियमित प्रवाशांचा स्वस्तातील आणि वेगवान प्रवास सुरू होईल, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली.

ऑक्टोबर महिन्यांत विशेष गाड्या बंद होऊन कोरोना पूर्व काळातील सामान्य गाड्या सुरू होणार, अशा आशयाचा संदेश समाज माध्यमावरून प्रसारित होत आहे. मात्र, याबाबत मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोणताही दुजोरा दिला नाही. अशा कोणत्याही प्रकारच्या सूचना नसल्याचे मध्य आणि कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.

"रेल्वेने कोरोनाच्या आपत्ती काळात नफा कमविण्याची संधी शोधली आहे. आता कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वत्र लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आहेत. त्यामुळे रेल्वेने आता कोरोना पूर्वीसारखे लांब पल्याच्या गाड्यांचे तिकीट दर तयार करावेत. जास्त तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट थांबविली पाहिजे."

- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद

"पॅसेंजर गाडी बंद असल्याने आणि विशेष गाड्या चालविण्यात येत असल्याने मागील वर्षीपासून प्रवाशांना खिशातील जादा पैसे खर्च करून तिकीट खरेदी करावे लागत आहे. आता कोरोनाची परिस्थिती सुधारत असताना रेल्वेनेही बदल करणे अपेक्षित आहे. प्रवाशांवरील जादा तिकीट भार कमी करावा."

- मधू कोटीयन, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com