अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दिला महत्त्वपूर्ण निर्णय

अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दिला महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई, ता. 5 : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग सत्र न्यायालयात 16 एप्रिलपर्यंत गैरहजर राहण्याची मुभा आज मुंबई उच्च न्यायालयाने दिली.

नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी गोस्वामी यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना 10 तारखेला सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. मात्र हा गुन्हा रद्द करण्यासाठी गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आज (शुक्रवार 5. मार्च ) रोजी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे याचिकेवर निर्णय होईपर्यत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी द्यावी, असे गोस्वामी यांच्या वतीने सांगण्यात आले. खंडपीठाने ही मागणी मान्य केली असून गोस्वामी यांना 16 एप्रिलपर्यंत दिलासा दिला आहे.

वास्तुविशारद असलेल्या नाईक यांनी आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी गोस्वामी यांच्यासह तीनजणांचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सन 2018 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटकही केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

mumbai news anway naik case big relief to arnab goswami no need to come in court till 16th april 2021

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com