देशाची आर्थिक राजधानी 'मुंबई'त लॉकडाऊन लागणार का ? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

देशाची आर्थिक राजधानी 'मुंबई'त लॉकडाऊन लागणार का ? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

मुंबई 15 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. आरोग्यमंत्री म्हणाले, राज्यात बाधीत होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही. 

संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. 

राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यामध्ये लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगतानाच 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले.

मुंबईत लॉकडाऊन लागणार ? 

मुंबईत लॉकडाऊन कधी करावा याचे काही निकष आहेत. त्या निकषांमध्ये आपण मुंबईचे आकडे पहिले तर ते नक्कीच जास्त आहेत. मात्र या केसेसमध्ये ८५ टक्के केसेस या एसिम्टमॅटिक आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना होम क्वारंटाईन यामध्ये ठेवावं लागतं, त्यांना रुग्णालयात ठेवण्याची गरज भासत नाही. मुंबईतील ऑक्सिजन, व्हेन्टिलेहर आणि ICU चे बेड्स हे केवळ २० ते २५ टक्केच भरले आहे. त्यामुळे मुंबईत अशी कोणतीही करणे नाहीत ज्यामुळे तातडीने मुंबईत लॉकडाऊन  लावले लागेल असं राज्याचे अर्थमंत्री राजेश टोपे म्हणालेत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com