

Dharavi Redevelopment
ESakal
माटुंगा येथे रेल्वेच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमधील घरांवर पूर्णतः धारावीकरांचा मालकी हक्क राहणार असून याबाबत कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याची माहिती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये स्थलांतरित होणाऱ्या धारावीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार आहे.