
मुंबई ः खाजगी कार्यालये सुरु करण्यास महाराष्ट्र सरकार कधी मंजूरी देणार या प्रश्नाने अनेकांना सतावले आहे. मात्र उपनगरी रेल्वे सुरु झाल्याशिवाय या कार्यालयाना सुरु होण्यास मंजूरी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई सध्या रेड झोनमध्येच आहे. त्यात नजिकच्या दिवसात तरी बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यानंतरही महत्त्वाची सरकारी कार्यालये, निर्यात वाढवणारा हिरे उद्योग तसेच खाजगी कार्यालयांना 33 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास मंजूरी देण्याची मागणी होत आहे.
खाजगी कार्यालये सुरु करण्याचे ठरवल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरु करणे भाग पडेल. त्यासंदर्भात केद्र सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा करीत आहोत. खाजगी कार्यालये सुरु केली आणि त्याचवेळी उपनगरी रेल्वे सेवा सुरु न झाल्यास बेस्टवर जास्त ताण पडेल. सार्वजनिक वाहतूकीतील गर्दी कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा भिन्न असाव्यात असाही विचार आहे.
स्टॅम्प ड्यूटी रजिस्ट्रेशन, आरटीओ तसेच जीएसटी कार्यालय सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे. मात्र कंटेनमेंट विभागातील कार्यालये बंदच राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, खाजगी कार्यालये सुरु केल्यास कार्यालये कर्मचाऱ्यांची वाहतूक करु शकतील का याचीही चाचपणी सुरु आहे. अंतिम निर्णय काही दिवसात होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.