BMC : स्थायी समितीत ८४० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला भाजपचा आक्षेप

BMC
BMCsakal media

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकरणातील (Maharashtra Politics) सर्वात जुने आणि निखळ मित्र असलेल्या शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) मधील संघर्षाला महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर अधिकच धार आली आहे. प्रत्येक मुद्दयावरुन दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (Sthayi samiti) आज भाजपने तब्बल 840 कोटी रुपयांच्या प्रस्तावांवर (Objection on proposal) आक्षेप घेतला आहे. या 840 कोटीमध्ये तब्बल 752 कोटी 82 लाख रुपयांचे तब्बल व्हेरिएशनचे प्रस्ताव आहेत.

महानगर पालिकेची आगामी निवडणुक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. शिवसेनेपुढे महानगरपालिकेतील सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे, तर भाजपला महापालिकेत सत्ता मिळवण्याचे आव्हान आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप वाढले आहे. वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर उपचारात झालेल्या दिरंगाई वरुन भाजपने शिवसेनेवर हल्ला चढला होता. तो वाद महिला आयोगापर्यंत पोहचला आहे.

या शाब्दीक चमकीनंतर आज स्थायी समितीतही आज शिवसेना भाजपमध्ये संघर्ष झाला.सागरी किनारी मार्गाच्या सल्लागाराला 64 कोटी 91 रुपये शुल्क देण्याच्या प्रस्तावावर भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी आक्षेप घेतला. महालेखापाल (कॅगने) कोस्टल रोडसाठी झालेल्या अधिक खर्चावर ठपका ठेवला आहे. त्यामुळे या सल्लागाराने आता पर्यंत काम केले,त्याला किती शुल्क देण्यात आले.यापुर्वीच्या सल्लागाराची नियुक्ती रद्द केली त्याला किती शुल्क दिले असे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली.

मात्र,स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बहुमताने हा प्रस्ताव मंजूर केला.त्यावर भाजपने घोषणाबाजी सुरु केल्यावर शिवसेनेच्या नगरसेवकांनीही घोषणाबाजीने उत्तर देण्यास सुरवात केली. अखेरीस जाधव यांनी बैठकीचे कामकाज संपल्याचे घोषीत करुन वादावर पडदा टाकला. भाजपचा आक्षेप असलेला दहिसर कोविड केंद्रांचे 20 कोटी रुपयांचे दोन प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.

महानगर पालिकेने धारावी पुरनियंत्रणासाठी 91 कोटी हिंदमाता पुरनियंत्रणाचे 142 कोटी रुपयांचे प्रस्ताव, शाळांच्या देखभालीचा 352 कोटी रुपयांचा खर्च, अंधेरी तेली गल्ली उड्डाण पुलाच्या ग्रेड सेप्रेटरचा 156 कोटी रुपयांचा खर्च असे 752 कोटी 82 लाखांचे प्रस्ताव आहेत. हे प्रस्ताव या बैठकीत राखून ठेवण्यात आले आहेत. मात्र, येत्या काही दिवसात हे प्रस्ताव मंजूर होतील. त्यावर भाजप शिवसेनेमधील संघर्ष वाढणार आहे.

"शिवसेनेला संघर्ष नवा नाही. संघर्षातूनच शिवसेना जन्माला आली आहे. संघर्ष कोणाशी करायचा हे शिवसेना ठरवते. मुंबईतील नागरिकांना सुख, सुविधा देण्यासाठी शिवसेना नेहमीच आग्रह असते. तर, काही पक्ष फक्त आरोप करत विकास कामे थांबविण्याचे कट कारस्थान करत आहेत. रोजच्या रोज आरोप करुन भाजप फक्त राजकरण करत आहे. कोस्टल रोडच्या कामात घोटाळ्याचा आकडा भाजपचे नेते, नगरसेवक वेग वेगळा आकडा सांगत आहे. त्यांनी घोटाळा कितीचा झाला हे अगोदर निश्‍चित करावे."

- यशवंत जाधव, स्थायी समिती सदस्य.

"गेले अडीज वर्ष कोविडमुळे प्रत्यक्ष सभा बंद होत्या. ऑनलाईन सभेत आम्ही कितीही विरोध केला तरी त्याची नोंद घेतली जात नव्हती. आता प्रत्यक्ष सभा सुरु झाल्या असून त्यात केलेला विरोध लक्षात येतो. भाजपची भूमिका 25 वर्षांपासून पाहारेकऱ्याचीच राहीली आहे.अयोग्य आणि भ्रष्ट प्रस्तावाला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. आजही विरोध करताेय."

- भालचंद्र शिरसाट, भाजप स्थायी समिती सदस्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com