

Mumbai
esakal
मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत १२.४४ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा ४१.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.