Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

Mumbai Dam Storage Improves After Heavy Rain, Reservoir Levels Still Under Watch : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा ९.४१ टक्क्यांवर पोहोचला असून मुसळधार पावसामुळे साठ्यात वाढ झाली असली तरी पुढील पावसावरच परिस्थिती अवलंबून आहे.
Mumbai Dam Water Levels Rise After Heavy Rain

Mumbai Dam Water Levels Rise After Heavy Rain

esakal

Updated on

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ९.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून त्यात सुमारे ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली असली, तरी मागील वर्षाच्या तुलनेत साठा अद्याप समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत किती पाऊस पडतो, यावरच मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com