Mumbai : माेठी बातमी.. ‘नमो सन्मान’च्या वाढीव हप्त्यावर फुली; नव्या योजनेत सरकार करणार गुंतवणूक..

एक रुपयांच्या पीकविम्यापोटी कंपन्यांना द्यावा लागणारा अतिरिक्त हप्ता भांडवली गुंतवणुकीसाठी वळविण्याची उपरती सरकारला झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पीकविमा कंपन्यांना सहा हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागले. आता तेच पैसे भांडवली गुंतवणुकीसाठी वापरू असे सरकारचे म्हणणे आहे.
Farmers to benefit as Maharashtra government increases Namo Sanman scheme payouts and announces fresh investment.
Farmers to benefit as Maharashtra government increases Namo Sanman scheme payouts and announces fresh investment.Sakal
Updated on

-बाळासाहेब पाटील

मुंबई : विधानसभा निवडणुकीत ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेच्या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करण्याची केलेली घोषणा महायुती सरकारने बासनात गुंडाळली आहे. पीकविमा योजना आणि नमो शेतकरी महासन्मान या दोन योजनांमधून कोणतीही भांडवली गुंतवणूक होत नसल्याची उपरती आता सरकारला झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com