'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही'; नाना पटोलेंनी सरकारला फटकारले

'दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही'; नाना पटोलेंनी सरकारला फटकारले

मुंबई - राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. परंतु अधिवेशन दोनच दिवसांचे असल्याने विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. दोन दिवसाचे अधिवेशन लोकशाहीला परवडणार नाही अशाने जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही. या शब्दात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

कोरोना काळानंतर राज्यात अनेक प्रश्न आहेत. आमदारांचे अधिकार आणि जनतेचे प्रश्न सभागृहातच मांडता येतात. म्हणून सरकारने विरोध पक्षासोबत बसून सोशल डिस्टंन्सिंगची नियमावली तयार करावी. दोन दिवसांचा वेळ विधिमंडळ कामासाठा अपुरा आहे. असे मत नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या सुरवात करताना मांडले.

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या रवि राणा यांना पोलिसांनी तुरूंगात डांबले होते. त्यांना दिवाळीत तुरूंगात रहावे लागले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली. आमदार रवि राणा यांनी सरकारविरोधी फलक सभागृहात झळकावले. त्यांच्या कृतीवर आक्षेप नोंदवत नाना पटोले यांनी अशा प्रकारचे फलक घेऊन येणाऱ्यांना सभागृहात न सोडण्याच्या सुचना केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com