Navi Mumbai: नवी मुंबईत वीज संकट! नागरिक मध्यरात्री रस्त्यावर; महिला अंथरून घेऊन पोहोचली महावितरण कार्यालयात

Navi Mumbai Electricity Cut: नवी मुंबईत वीज संकट निर्माण झाले असून नागरिकांनी मध्यरात्री ठिय्या आंदोलन सुरू केले. तसेच महिला अंथरून घेऊन महावितरण कार्यालयात गेल्याचे समोर आले.
Navi Mumbai Power Crisis

Navi Mumbai Power Crisis

ESakal

Updated on

पनवेल : पाणीटंचाई आणि गढूळ पाणीपुरवठ्याने आधीच होरपळणाऱ्या कामोठेकरांच्या अडचणीत आता वीज संकटाची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयमाचा शनिवारी (ता. ७) रात्री अखेर उद्रेक झाला आणि हजारोंच्या संख्येने घराबाहेर पडत महावितरणसह लोकप्रतिनिधींविरोधात एल्गार पुकारला. नागरिकांनी कामोठे पोलिस ठाण्यावर धडक देत मध्यरात्री ठिय्या आंदोलन सुरू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com