‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’

‘सुधारतील असे वाटले होते पण, गणेश नाईक पुन्हा चुकले’

नवी मुंबई : मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे निवडून येतील हे कुणालच वाटले नव्हते; मात्र त्यांनी गणेश नाईकांचा अनपेक्षित पराभव केला. नाईकांच्या चुकांमुळे लोकांनी त्यांना नाकरले. पाच वर्षांत ते आपल्या चुका सुधारतील असे वाटले होते; मात्र आता नाईक पुन्हा दुसऱ्यांदा चुकले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत केली.

पळपुट्यांची चिंता करू नका
माजी मंत्री गणेश नाईक भाजपवासी झाल्यानंतर नवी मुंबईत गणपतशेठ तांडेल मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या वेळी पवार म्हणाले, ‘सत्ताधाऱ्यांचे काम रोजगार निर्मितीचे असते; मात्र विद्यमान सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी हातांचे काम हिसकावून घेतले आहे. त्यामुळे हा काळ संघर्षाचा आहे. तो टाळण्याऐवजी अनेक जण स्वतःच्या स्वर्थासाठी सत्तेच्या पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या पळपुट्यांची अजिबात चिंता करू नका. जनता त्यांना धडा शिकवणार आहे.’

जनता स्वाभिमानी
माझ्या ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी २७ वर्षे सत्तेच्या बाहेर होतो, पण काम करताना कधीच अडचण आली नाही, असे पवार म्हणाले. ते म्हणाले, ‘विरोधात असतानाही चांगली कामे करता आली. सरकारला सध्या अनेक आघाड्यांवर अपयश आले आहे. चुकीच्या निर्णयांमुळे देशाच्या इतिहासात सर्वांत मोठी मंदीची लाट आली आहे. मूठभर लोकांचे भले करण्यासाठी कोट्यवधी लोकांचे रोजगार हिसकावून घेतला आहे. त्याविरोधात संघर्ष करण्याऐवजी काहींनी पळ काढला आहे; मात्र त्यांचा कोणाताही विचार करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्र हे स्वाभिमानी लोकांचे राज्य आहे. आपली माणसे स्वाभिमानाशी तडजोड करत नाहीत, त्यामुळे पळपुट्यांची अवस्था वाईट होणार आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com