Mumbai News: रात्रशाळांसाठी २०२२चे धोरण घातक, शिकवणीचे तास कमी केल्याने निकालावर परिणाम

Education Department: २०२२ रोजी रात्रशाळांसाठी नवे धोरण आणण्यात आले होते. मात्र आता या धोरणामुळे शाळांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Night schools policy

Night schools policy

ESakal

Updated on

संजीव भागवत

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने मुंबईसह राज्यातील रात्रशाळांच्या गुणवत्तेसाठी १७ मे २०१७ला आणलेले धोरण काही राजकीय संघटनांनी मोडीत काढले. तसेच तत्कालीन सरकार संकटात सापडले असताना ३० जून २०२२ रोजी रात्रशाळांसाठी नवे धोरण आणण्यात आले. हे धोरणच राज्यातील रात्रशाळांसाठी घातक ठरले. असंख्य रात्रशाळा शेवटची घटका मोजत असून, या धोरणाच्या आडून दुबार नोकरी करणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र गब्बर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com