मास्क लावला नाही! 267 दिवसात तब्बल 8 लाख 20 हजार जणांवर कारवाई

मास्क लावला नाही! 267 दिवसात तब्बल 8 लाख 20 हजार जणांवर कारवाई

मुंबईः मास्क न वापरणाऱ्या विरोधात आतापर्यंत 8 लाख 20 हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 16 कोटी 76 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल महिन्यापासून ही कारवाई सुरु होऊन 267 दिवस पूर्ण झाले आहेत.

कोविडमुळे सार्वजनिक ठिकाणी वावरताना महापालिकेने मास्क सक्तीचे केले आहेत. मात्र, आजही शेकडो जण रस्त्यावर मास्क न लावता फिरत आहे. अशांना हटकल्यावर पालिकेच्या पथकावर हल्ले झाल्याचे प्रकारही घडले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांकडून महापालिका 200 रुपये वसूल करत असून त्यांना मास्कही मोफत दिला जात आहे. सर्वाधिक कारवाई अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम के पश्चिम प्रभागात झाली आहे. येथे 54 हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई झाली असून 11 लाख 35 हजाराचा दंड वसूल झाला आहे. त्या खालोखाल कुर्ला एल प्रभागातून 47 हजार 472 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून 9 लाख 69 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

के पूर्व अंधेरी जोगेश्वरी पूर्व येथे 47 हजार 472 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून 9 लाख 63 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

बुधवारी 26 लाख 91 हजाराची वसूली 

बुधवार ( ता.23) ला 13 हजार 459 जणांवर कारवाई करण्यात आली असून 26 लाख 91 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. के पश्चिम प्रभागातून 2 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Not wearing masks bmc action 8 lakh 20 thousand people in 267 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com