

He stressed that youth need constructive guidance and that violence cannot be a path to meaningful change in a democracy.
Sakal
मुंबई : देशभरात सुरू असलेल्या राष्ट्रीय आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर समाजात संवाद, शांती आणि ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, मीडिया प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी मैत्रीबोध परिवाराचे संस्थापक व दूरदर्शी मार्गदर्शक मैत्रेय दादाश्रीजी यांच्या सान्निध्यात विधायक संवाद साधला. यावेळी स्मिता जयकर, राज अर्जुन, काजल अग्रवाल, मकरंद देशपांडे, कुनिका सदानंद, आदिनाथ कोठारे, स्नेह झाला, RJ मलिष्का, मानव मंगलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.