मुंबई : गणपतीसाठी गावी जाण्यास चाकरमान्यांची सुरुवात झाली आहे. मात्र, यंदाचा प्रवास नेहमी सारखा सोप्पा नाही. तुफान पाऊस त्यातच लॉकडाऊन मुळे हॉटेल्स पासून किरकोळ दुकानेही तुरळक उघडी असल्याने सोबत शिदोरी घेऊन गेलेलं बरं.
कोरोनामुळे गणपतीसाठी यंदा 7 ते 14 दिवस अगोदर गावी जावे लागणार आहे. त्यासाठी आता पासूनच मुंबई गोवा मार्गावर वाहानांची गर्दी होऊ लागली. त्यात अतिवृष्टीमुळे ठिक-ठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून पुढील दोन तीन दिवस असाच पाऊस राहाणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
त्याचबरोबर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे बहूसंख्य हॉटेल्स बंद असल्याने खाण्यापिण्याचे चांगलेच वांदे होऊ शकतात. त्यामुळे सोबत जेवणाचा डबा, पाणी ठेवणे गरजेचे आहे. हॉटेल्स बंद असल्याने स्वच्छतागृहांची उपलब्धताही कमीच आहे.
प्रवास करता 'हे' लक्षात ठेवा
people who are travelling for ganeshotsav these days are requested to carry their own food
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.