Nilai Poetry Collection Publish
sakal
मुंबई - 'निळाई' या काव्यसंग्रहातून व्यक्त झालेल्या कवितांमधून एक अखंड आत्मशोधाचा प्रवास व्यक्त झालाय. जिथे मन शांत आणि निवांत होते अशा भावावस्थेचा आपण प्रत्येकजण शोध घेत असतो, तो शोध घेणाऱ्या या कविता जीवाला शिव तत्त्वाचा स्पर्श घडवू पाहातात असे गौरोवोद्गार महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव व ज्येष्ठ कवयित्री डॉ. मिनाक्षी पाटील यांनी केले.