डोंबिवली - कल्याणशीळ रोडवरील नवीन पलावा पुलाचे उद्घाटन व कामावरून कल्याण ग्रामीणचे आजी माजी आमदारांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. आपला त्या खांडवर झाला नाही तर घाईघाईने आमदारांनी पुलाचे उद्घाटन का केले?.दुसऱ्या पुलाची अलाइनमेंट का चेंज करण्यात आली असा सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी केला तर शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन आमदार राजेश मोरे यांनी विरोधकांनी काय बोलायचे त्यांना बोलू द्या, आमचे काम बोलेल असे सांगितले.कल्याण-कल्याण शीळ रोडवर असलेल्या नवीन पलावा पूलावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी सोमवारी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या कामात काय त्रुटी आहेत हे दाखवून दिले..प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, पुलाचे अजूनही काम सुरू आहे, ते पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराने संबंधित प्रशासनाला हा पूल अद्याप हस्तांतरीत केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला. पुलावर काही अपघात झालेत.याप्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत तसेच एसीबी कडे यांची तक्रार केली गेली पाहिजे असे ते म्हणाले. या पुलाच्या गर्डर बसविण्याच्या कामाचे फटाके फोडून उत्साह करण्यात आला होता. मग पुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते केले नसते का ? भीतीपोटी त्यांनी हा पूल सुरू केला..अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे काम केले असल्याने याठीकाणी लोकांचे बळी जाऊ शकतात. त्यांनी लवकरात लवकर या पूलाची डागडुजी करावी अशी आमची मागणी असल्याचे मनसेचे नेते राजू पाटील यांनी सांगितले.तसेच दुसऱ्या अर्धवट पुलाची पाहणी करत ते म्हणाले, या पुलाची अलायमेंट बदलण्यात आली आहे ती कशासाठी हा सवाल देखील उपस्थित केला आहे. शिवसेना ठाकरे घटाने पुलावरील अपघाता प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याविषयी माजी आमदार पाटील म्हणाले,.पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी एबीसीकडे याची तक्रार करायला हवी. याच्यात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदारीची चाैकशी करण्यात यावी, तेव्हा या पूलाच्या कामातील काळंबेरं बाहेर येईल. पोलिस या प्रकरणात केवळ ठेकेदाराला नोटिस देतील त्यातून काही साध्य होणार नाही याकडे पाटील यानी लक्ष वेधले आहे..हा पूल झाला तो दुरुस्त होऊन सुरु होईल. याच पूलाची दुसऱ्या मार्गीकेची अलायमेंट बदलली आहे. त्याठिकाणी काम सुरु आहे. तिथे काही अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल पाटील यांनी उपस्थीत करीत याला आयुक्त देखील जबाबदार असतील असे भाष्य केले आहे. या पूलाच्या मार्गिकेसह दिवा पूलाची, मेट्रोची अलायमेंटही चेंज करण्यात आली आहे. बड्या बिल्डरांच्या हितासाठी ही अलायमेटं चेंज केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे..विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना कल्याण ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन आमदार राजेश मोरे म्हणाले, विरोधकांनी काय बोलायचे ते त्यांनी ठरवावे. पत्री पूल, माणकोली पूलाच्या नावाने देखील आमच्यावर खापर फोडले गेले. मात्र विकासाच्या मुद्यावर आम्ही पूढे जाणार. आम्हि काम करतो व आमचे काम बोलेल. लोकांना आम्ही काय देऊ शकतो यावर आमचे लक्ष आहे असे ते म्हणाले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.