

Suryaghar Yojana
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत देशात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, आतापर्यंत तब्बल १,७२२ मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. चार लाख ६५ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना केंद्र सरकारचे अनुदान मिळाले असून, वीजबिलावर खर्च होणारी जादाची रक्कम कमी झाली आहे.