
मुंबई : उन्नाव प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करीत विश्वकर्मा समाजातर्फे आझाद मैदानात मंगळवारी (ता. 7) धरणे आंदोलन करण्यात आले. उत्तर प्रदेशमध्ये सरकारकडून विश्वकर्मा समाजाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून गेल्या दहा वर्षांत समाजातील मुलींवरील अत्याचाराच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे म्हणणे आंदोलकांनी मांडले.
हे वाचलंत का : पोलिसाच्या धाकाने सई ताम्हणकरने गायलं गाणे
उन्नाव येथील तरुणीवर डिसेंबर 2018 मध्ये रायबरेलीमध्ये पाच जणांनी अत्याचार केला होता. नंतर 5 डिसेंबर 2019 रोजी प्रकरणाच्या सुनावणीसाठी जात असताना पीडितेला भररस्त्यात गाठत आरोपींनी तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभम त्रिवेदी, शिवम त्रिवेदी, उमेश वाजपेयी, राज किशोर, हरिशंकर आदींना अटक केली आहे. सुनावणी लवकरात लवकर पुर्ण करून आरोपींना फासावर लटकवा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
आजच्या आंदोलनात जवळपास 70 संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. हरिप्रसाद विश्वकर्मा, बाबूलाल विश्वकर्मा, बिपिन सुतार आणि राधेश्याम विश्वकर्मा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पीडितेला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला भाग पाडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.