
मुंबई: ‘धारावी ही तुमची आहे आणि तुमचीच राहील’ असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी धारावीकरांना गुरुवारी दिला. धारावीला दिलेल्या भेटीत त्यांनी चामड्याच्या वस्तू हाताने आणि मशीनवर शिवण्याचा अनुभव घेतला. दलित समाजाशी निगडीत असणाऱ्या या व्यवसायला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारने त्यांच्या मागे पाठबळ उभे करण्याची आवश्यकताही गांधी यांनी व्यक्त केली.