Rahul Gandhi: राहुल गांधींचा ED-CBIला इशारा; म्हणाले, भाजप सरकार बदलेलं तेव्हा, मी गॅरंटी देतो...

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Rahul Gandhi_ED_CBI
Rahul Gandhi_ED_CBI

ठाणे : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात पोहोचली आहे. या ठिकाणी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यासह देशभरात सुरु असलेल्या ईडी-सीबीआयच्या कारवायांवर भाष्य केलं. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना इशाराही दिला. (rahul gandhi warning to ed cbi when the bjp government changes such action would never happened again)

राहुल गांधी म्हणाले, "सीबीआय-ईडी अशी काही गोष्ट आता राहिलेली नाही. कारण ते आता भाजपची हत्यारं बनली आहेत. या संस्था आता भाजपच्या नियंत्रणात आहेत. यामध्ये निवडणूक आयोग असू द्यात किंवा सीबीआय-ईडी असू द्या, ते आता भाजप आणि आरएसएसची हत्यारं आहेत. त्यांनी या गोष्टीचाही विचार करायला हवा की कधी ना कधी भाजपचं सरकार बदलेल त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल की मी गॅरंटी देतो हा प्रकार पुन्हा कधी होणार नाही" (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com