

Revas-Karanja Creek Bridge
ESakal
Mumbai Konkan bridge project : महाराष्ट्र राज्य रसपुल्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाली असून, प्रकल्पाचे सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई आणि कोकणाला थेट जोडणारा हा महत्त्वाकांक्षी दुवा येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मार्च २०२८ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा शासनाचा निर्धार आहे.