राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, अयोध्या दौऱ्यासाठी दानवेंना पत्र?

तीन मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर आम्ही त्यापेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता.
Raj thackeray
Raj thackeraySakal

गुढीपाडव्यापासून राज्यात राज ठाकरेंबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्या दिवशी झालेल्या सभेतलं राज यांचं भाषण, त्यावर सर्वपक्षीय राजकारण्यांनी केलेल्या टीका-टिपण्ण्या आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरेंनी घेतलेली उत्तरसभा यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. याच सभेदरम्यान त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यावरून आपली भूमिका मांडली होती आणि ३ मेचा अल्टिमेटम दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. (Raj Thackeray on Ayodhya)

येत्या पाच जूनला राज ठकरे अयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यासाठी बैठकीत महत्वाच्या विषयांवर खलबंतं पार पडत आहेत. अयोध्येचा दौरा मोठा करण्यासाठी मनसेच्या वतीने १० ते १२ रेल्वे गाड्या बूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी राज ठाकरे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पत्र लिहिणार असल्याचं कळतंय. (Raj Thackeray on Raosaheb Danve)

Raj thackeray
'सोयीनुसार आणि सुपारीनुसार...' पुण्यात राज ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी

या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, गजानन काळे, शिरीष सावंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या मुंबईतल्या निवासस्थानी पोहोचत आहेत. राज्यातल्या मशिदीवरील भोंगे तीन मेपर्यंत उतरवले गेले पाहिजेत असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी आपल्या सभेतून राज्य सरकारला दिला होता. याच संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

३ मेला जर मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल? याबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे. ११ वाजता ही बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी होणार असल्याची माहिती हाती येत आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

ठाण्यामध्ये झालेल्या आपल्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेतल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाला मशिदीवरील भोंगे काढण्याचं आवाहन केलं होतं. तसंच प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा, सणांच्या दिवशी आपण समजू शकतो पण वर्षाचे सर्वच दिवस हे चालणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.

तसंच तीन तारखेला ईद आहे. त्यामुळे तीन मेपर्यंत मशिदीवरील सर्व भोंगे काढा, भोंगे उतरले नाहीत तर आम्ही त्यापेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा अल्टिमेटम राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com