Raj Thackeray : मांसविक्री, कत्तलखाने बंदीवरुन राज ठाकरे भडकले, म्हणाले- स्वातंत्र्यदिनीच लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय

Raj Thackeray : मी आमच्या लोकांना दोन्ही गोष्टी चालू ठेवण्यास सांगितले आहे. महानगरपालिकेला या सर्व गोष्टींचे आदेश देण्याचे अधिकार नाहीत. कोणी काय खावे कोणी काय खाऊ नये, याचे निर्णय सरकारने, महापालिकेने घेऊ नयेत.
Raj Thackeray
Raj Thackeray addressing media over meat sale ban on Independence Daysakal
Updated on

Summary

  1. राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी मांसविक्री आणि कत्तलखाने बंदीचा विरोध करून लोकांचे खाण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात असल्याची टीका केली.

  2. त्यांनी महानगरपालिकेला अशा आदेश देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत लोकांना मांसविक्री चालू ठेवण्याचे आवाहन केले.

  3. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारचा अशा निर्णयाशी काहीही संबंध नसल्याचे आणि हा जुना 1988 चा जीआर असल्याचे स्पष्ट केले.

Meat Sale Ban: राज्यातील अनेक महापालिकांनी १५ ऑगस्टला कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय. या निर्णयामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही सरकारने लोकांनी काय खावे न खावे हे ठरवू नये. स्वांतत्र्यदिनीच आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जातेय अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com