कामोठे (जि. रायगड) - ‘देशाला दिशा देणारा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे; यासाठी प्रत्येक मराठी माणसाने मराठी अस्मिता जपली पाहिजे, परप्रांतीय उद्योजकांच्या घशात जमिनी घालू नका, व्यवसायात भागीदार व्हा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भूमिपुत्रालाच रोजगार, व्यवसाय मिळाला पाहिजे.’ असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन पनवेल येथे केले.