Ravikant Tupkar
sakal
मुंबई - शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी आणि योजनेपासून वंचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर २७ ऑगस्टला पुन्हा मुंबईला धडक देणार आहेत. आठवडाभरात सरकारने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास, मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने जप्त करून त्यांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करण्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.