डोंबिवली : कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उफाळलेली कार्यकर्त्यांची नाराजी शांत करण्यासाठी अखेर भाजप नेतृत्व प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट हस्तक्षेप केल्याचे चित्र दिसून आले. “आहे त्या जागांवर समाधान माना आणि महायुतीतच निवडणूक लढा” हा स्पष्ट संदेश देत वरिष्ठ पातळीवर झालेल्या युती निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जागावाटपावर असमाधान असले तरी युतीतून बाहेर पडण्याचा पर्याय नसल्याचे सूचक संकेत या सूचनेतून देण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.