
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला लागलेले विकासाचे ग्रहण दूर करण्यासाठी इकडे भाजपचा महापौर असणे आवश्यक आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याणात व्यक्त केले. येत्या पालिका निवडणुकीत भाजप स्वाबळावर लढणार असे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. कल्याणातील सामाजिक कार्यकर्ते जतिन प्रजापती यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रविवारी भाजपात प्रवेश केला. यामुळे कल्याण मध्ये भाजपचे ताकद वाढल्याचे बोलले जात आहे.