परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपले; शेतकरी हवालदिल; पीक वाया जाण्याची भीती

परतीच्या पावसाने भातशेतीला झोडपले; शेतकरी हवालदिल; पीक वाया जाण्याची भीती


माणगाव : खरीप हंगामातील भातशेती कापणीस तयार होत आहे. सध्या कोरोनाच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत; मात्र परतीचा पाऊस शेतीला झोडपून काढत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

कोरोनाचे सावट, निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसत आहे. जूनपासून सुरू झालेल्या पावसाने भाताची पेरणी, लावणीची कामे वेळेत व लवकर झाली होती. तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी 90 दिवसांत तयार होणारी भाताची जात लागवड केली होती. तर काही भातशेती 120 दिवसांत तयार होणारी आहे. मात्र, दररोज हजेरी लावणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाने लोम्बित आलेल्या भातशेतीला झोडपून काढले आहे. उभे असलेले पीक यामुळे जमिनीलगत वाकली आहेत. त्यामुळे लोम्बिंचे नुकसान होत आहे. पाऊस असाच शेतीला झोडपत राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाईल, या चिंतेने शेतकरी असून, भातशेती संकटात सापडली आहे.

भातशेती कापणीस तयार होत आहे. परतीच्या पावसाने उभे पीक आडवे होत आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास पिकाचे नुकसान होईल. कोरोनामुळे रोजगार बंद आहेत. निसर्ग वादळात घरांचे नुकसान झाले आहे. आता परतीच्या पावसाचा तडाखा बसत असून, शेती जमीनदोस्त होत आहे.
- बाळाराम भोनकर,
शेतकरी

वारा, गडगडाटी पावसाने शेतीचे नुकसान होत आहे. लोम्बित आलेला भात झोडपून पडल्याने पळज निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. या वर्षी तिहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.
- संदीप खडतर,
अध्यक्ष, 
आत्मा शेतकरी संघटना, माणगाव

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com