मोखाडा - दिवाळी सणं सरला आणि खरीप हंगामाचे कामे ही अंतिम टप्प्यात आले आहेत. मोखाड्यात शेती व्यतीरिक्त दुसरे कुठलेही रोजगाराचे साधन नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना हीच मजुरांच्या हात कामाला देणारी एकमेव सरकारी योजना आहे..साधारणत: 2 ऑक्टोबर ला गांधी जयंती ला, या योजनेची सुरूवात केली जाते. मोखाडा तालुक्यात मोठी मजुर संख्या असल्याने, कामांची निर्मीती ही मोठ्या प्रमाणात होणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यात सरकारी यंत्रणांनी तुटपुंजी कामे सुरू केल्याने, मजुरांनी आपल्या कुटुंब, कबील्यासह शहराकडे स्थलांतराचा मार्ग धरला आहे..पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात खरीप हंगामाचे पीक हेच एकमेव रोजगाराचे साधन आहे. या व्यतिरिक्त शासनाची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही एकमेव शाश्वत रोजगार देणारी योजना आहे. प्रतिवर्षी याच योजनेवर बेरोजगार आदिवासी मजुरांना, रोजगारासाठी अवलंबून रहावे लागते आहे..तालुक्यात 33 हजार 844 कुटुंबातील 73 हजार 463 जाॅबकार्ड धारक मजुर संख्या आहे. मात्र, यामधील 15 हजार 933 कार्यरत जाॅबकार्ड धारक कुटुंबातील 34 हजार 245 मजुर कार्यरत असल्याची सरकारी आकडेवारी आहे. यंदा खरीपाच्या शेतीच्या पीकाची माती झाली आहे.त्यामुळे स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या आशा मावळल्याने, शेतमजुर हतबल झाले. त्यांनी दिवाळी सणाला शहरी भागातील वीटभट्टी, दगडखाण मालकांकडून, मजुरीपोटी आगाऊ पैसे घेऊन प्रतिवर्षाप्रमाणे स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे या भागात मळणी आणि झोडणीच्या कामाला, मजुरांचा तुटवडा जाणवु लागला आहे..सरकारी धोरणानुसार 2 ऑक्टोबर महात्मा गांधींच्या जयंती दिनाला, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात येते. मात्र, सरकारी यंत्रणांच्या कामचुकार धोरणामुळे, सव्वा महीण्याच्या कालावधीत, तालुक्यात सरकारी यंत्रणांच्या केवळ 42 कामांवर 231 मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.तर पंचायत समितीच्या अखत्यारीतील ग्रामपंचायत स्तरावर 263 कामांवर 898 मजुरांना रोजगार उपलब्ध झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो बेरोजगार मजुरांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबला आहे..सरकारी धोरण कागदावर, मजुरांची शहराकडे धाव...प्रतिवर्षी पालघर जिल्ह्यातील हजारो मजुर शासनाच्या रोजगार हमी योजनेवर काम करतात. मात्र, शासनाच्या धोरणानुसार मजुरांना मागणीच्या 15 दिवसांत काम मिळत नाही. तसेच काम केल्यानंतर 15 दिवसांत मजुरी मिळत नसल्याने, सरकारी धोरण केवळ कागदावरच राहीले आहे. त्यामुळे आदिवासी मजुरांनी, सरकारी कामाकडे पाठ फिरवून, मजुरीची रक्कम रोज मिळण्यासाठी शहराकडे धाव घेत, स्थलांतराचा मार्ग धरला आहे..कृषी खात्याचे खात्रीचे काम आठवडाभर केले आहे. काम करून सहा महिने झाले आहेत. मात्र, या कामाची मजुरी अजुनही मिळालेली नाही. काम करून वेळेत मजुरी मिळत नाही, मग जगायचे कसे ? वेळेत मजुरी मिळत नाही, म्हणून आम्ही रोजगार हमी योजनेच्या कामांवर जात नाही. मिळेल ते काम येथे करतो, नाहीतर शहराकडे कामाला जातो.- प्रमोद वाळु हमरे, मजुर, खोडाळा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.