मुंबईः राज्यातील मंदिरं बंद प्रकरणावरुन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना लगेचच पत्र लिहून उत्तरं दिलं. त्यानंतर राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटला आहे. यातच आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा राज्यपाल आणि भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठाच सुरु आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलेले पत्र हा तर अगोचरपणाच म्हणायला हवा. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘एकच’ मारला, पण सॉलीड मारला! असा खोचक टोला शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.
Saamana Editorial Governor Bhagat singh koshyari Letter and bjp cm uddhav thackeray
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.