संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."

संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..." सध्या राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच गाजतोय Sanjay Raut Warning Pm Modi BJP Govt that Using Central Agencies to Annoy Mahavikas Aghadi govt can be dangerous
संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."

सध्या राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असा सामना राजकीय वर्तुळात चांगलाच गाजतोय

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खूप चांगली भेट झाली. सध्या विरोधकांकडून काही शाब्दिक हल्ले केले जात आहेत. मुद्दाम काही भ्रम निर्माण केले जात आहेत. काही आरोपही केले जात आहेत. त्या गोष्टीला त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज आहे. ईडी आणि सीबीआयचा वापर  महाराष्ट्र  सरकारविरोधात केला जातोय. राजकारणात  नवे  पायंडे पाडले जात आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही जी  हत्यारं वापरत आहात ती तुमच्या  विरोधातही उलटू शकतात. भाजप सरकारने याचा विचार करावा, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या केंद्रातील भाजप सरकारला दिला. दिल्लीतील आपल्या निवासस्थानी त्यांनी 'साम टिव्ही'शी खास बातचीत केली. तेव्हा त्यांनी आपली रोखठोक मतं मांडली. (Sanjay Raut Warning Pm Modi BJP Govt that Using Central Agencies to Annoy Mahavikas Aghadi govt can be dangerous)

संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."
विधानसभाअध्यक्ष निवडणूक : ‘राजभवना’च्या चालीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष्य

"काँग्रेसने सरकारी यंत्रणांचा वापर केला असा आरोप करून त्यांना दोषी ठरवणारं भाजप सरकार स्वत: त्याच मार्गाचा अवलंब करत आहे. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर होईल, अशा भ्रमात राहू नये. आमच्या मंत्र्यांना, आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, आमदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे यासाठी तपास यंत्रणांचा वापर करणे याला राज्य चालवणं म्हणत नाहीत. तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांची पथकच्या पथक बोलावलीत तरी आम्ही लढतच राहू", असे राऊत म्हणाले. तसेच, राज्यातील विरोधी पक्ष (भाजप) स्वतःचा अभिमन्यू करू इच्छित आहे का, हे देखील त्यांनीच ठरवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

संजय राऊतांचा थेट मोदींना इशारा; म्हणाले, "एक लक्षात ठेवा..."
जेव्हा हातातली सत्ता जाईल तेव्हा...; निलेश राणेंचे चॅलेंज

राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

"राज्यपालांनी अनेक स्मरणपत्र मुखमंत्र्यांना पाठवली आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी एकच स्मरणपत्र त्यांना पाठवलं आहे. ते म्हणजे १२ विधान परिषद आमदारांच्या नियुक्तीचे... राज्यपालांना याच प्रश्नाचं विस्मरण का होतं असावं, हा प्रश्न आहे. विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन राज्यपाल काम करत असतील तर घटनात्मक भूमिकेत जाऊन आम्हाला काही आठवणी करून द्याव्या लागतील", असे राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com