एका चुकीच्या शिक्षकांमुळे पिढी बरबाद होते - राज्यमंत्री बच्चू कडू

शिक्षकांच्या गुणवत्तेवरून शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षक आमदारांचे कान टोचले
Bachchu Kadu
Bachchu Kadu sakal

मुंबई : गुणवत्ता नसलेला एक शिक्षक चुकला तर लाखो विद्यार्थी आणि त्यांची पिढीही पुढे आयुष्यात चुकते. त्यामुळे या शिक्षकांच्या गुणवत्तेवर आणि गोरगरीब मुलांच्या दर्जेदार शिक्षणावर कधीही सभागृहात चर्चा होत नाही, ती चर्चा कधी तरी सभागृहात चर्चा केली जावी असे सांगत शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी शिक्षक आमदारांचे आज कान टोचले.

शिक्षक आमदार सुधीर तांबे यांनी राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, त्यामुळे मराठी शाळा बंद होत असल्याचा मुद्दा आज विधान परिषदेत अर्धातास चर्चेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. त्यावर कडू यांनी शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करीत राज्यातील प्रत्येक शाळेत गुणवान शिक्षक कसा जाईल, यासाठी सर्वांनी आग्रह धरला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकांची गुणवत्ताही पाहिली पाहिजे, असे ठणकावून सांगितले.

राज्यातील सरकारी, अनुदानित आदी शाळांतील जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार नसतील आणि केवळ लाभ घेत असतील तर त्यांच्या बाजूनं लोकप्रतिनिधीने उभा राहणं म्हणजे एक प्रकारचा करंटेपणा आहे. त्यामुळे शिक्षक काम करत नसतील तर आपण सर्वांनी हेही तपासून पाहिले पाहिजे. मात्र या विषयावर सभागृहात कधी चर्चा होत नाही. शिक्षकांना सरकार वेतन आणि सर्वकाही देतो. परंतु त्या बदल्यात जर हे शिक्षक गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देत नसतील आणि चुकत असतील तर त्यांच्यामुळे लाखो विद्यार्थी चुकतात आणि पुढची पिढीसुद्धा चुकते असे सांगत कडू यांनी शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी सदस्यांनी सभागृहात चर्चा करावी असे आवाहन केले.

गोरगरिबांच्या शाळेचा आणि त्यांच्या दर्जेदार शिक्षणाचा विषय सभागृहात राहिलेला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिक्षक आमदार केवळ पवित्र पोर्टल रद्द करून खाजगी संस्थांना शिक्षक भरती करण्याची मुभा मागत आहेत, परंतु या पोर्टलमध्ये असलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आग्रह धरत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.

शिक्षण घेण्यासाठी ज्यांच्याकडे पैसा आहे ते खाजगी शिक्षणाकडे वळतात. परंतु ज्यांच्याकडे काबाडकष्टही शिक्षणासाठी पैसा नसतो त्यामुळे त्यांची मुले मात्र सरकारी, अनुदानित शाळेत शिकत असतात. त्यांच्या शाळा चांगला झाल्या पाहिजे यासाठी प्रत्येक आमदारानी पुढे यावे असे आवाहनही कडू यांनी यावेळी केले. तसेच सर्वांनी मिळून आरोग्य, शिक्षण आणि शेतीवर काम करायला सुरुवात केली तर यातील अनेक प्रश्न सुटतील असेही कडू यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार सुधीर तांबे यांनी राज्यातील गोरगरीब विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा आणि त्यामध्ये शिक्षक रिक्त असल्याने दर्जेदार शिक्षण मिळणे अवघड झाले असल्याची बाब मांडली, त्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सभागृहात पहिल्यांदाच गरीब विद्यार्थ्यांच्या संदर्भात शब्द ऐकायला मिळाला त्यामुळे हा आजचा विषय आपल्याला आयुष्यभर स्मरणात राहील अशी भावनाही व्यक्त केली. शाळांच्या प्रश्नासंदर्भात अधिकार्‍यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे प्रशासनाला नोटीस देण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. शिवाय अधिकारी आडकाठी आणतात त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे कडू यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com