

Shashikant Shinde On NCP Merging
ESakal
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात रंगलेल्या चर्चेला आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पूर्णविराम दिला आहे. विलीनीकरणाच्या विषयावरून प्रश्न उपस्थित केले जात असल्याने, "आता हा विषय आमच्याकडून कायमचा बंद करण्यात आला आहे," असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी स्पष्ट केले.