शिवसेनेत संतापाची लाट; विरोधात 200 जणांचे राजीनामे

shivsena.jpg
shivsena.jpg

पुणे ः नवी मुंबईतील ऐरोली व बेलापूर हे दोन्ही मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपकडे गेल्याने, शिवसैनिकांत संतापाची लाट उसळली आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे दोनशे शिवसैनिकांनी त्यांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहेत. त्यामुळे, युतीला विशेषतः शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. दरम्यान, भाजपने ऐरोलीतून संजीव नाईक, तर बेलापूरहून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. 

नवी मुंबईचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री गणेश नाईक, ऐरोलीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संजीव नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक गेल्या निवडणुकीत बेलापूर मतदारसंघांत भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून दीड हजार मतांनी पराभूत झाले होते. तर, तेथे त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे विजय नाहाटा होते. ऐरोलीत गेल्या दोन्ही निवडणुकीत संदीप नाईक यांना शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी जोरदार लढत दिली होती. हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे गेल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. 

दोन्ही जागा भाजपकडे गेल्याने नाईक यांचा प्रभाव नवी मुंबईत पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे नाराज झालेले शिवसेनेचे शहरप्रमुख, अनेक पदाधिकारी यांनी पक्षाकडे राजीनामे दिले आहेत. त्यांची समजूत कशी काढणार, हा आता युतीच्या नेत्यांपुढील प्रश्‍न आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com