मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. शिरोमणी अकाली दलानं भाजपाची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अकाली दलानं कृषी विधेयकाला विरोध केला आहे. याच मुद्दयावर सामनाच्या अग्रलेखात भाजपवर टीका केली आहे. सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण एनडीएचे दोन खांब भाजपबरोबर राहिले ते म्हणजे शिवसेना आणि अकाली दल. आज या दोन्ही पक्षांनी एनडीएला राम राम ठोकल्याने एनडीएत खरंच राम उरला आहे काय? असा थेट सवाल शिवसेनेनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विचारला आहे.
Shivsena saamana editorial Criticism bjp shiromani akali dal nda
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.