मुंबई - राज्यात परवानाधारक सावकारांनी वितरित केलेल्या कर्जांत २०२२ नंतर तब्बल ४०० कोटी रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली..अमरावतीमधील बेकायदा सावकारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी प्रश्न विचारून राज्य सरकारकडे माहिती मागितली. अमरावती जिल्ह्यात ५७४ परवानाधारक सावकार असून, २०२६ मध्ये त्यांनी ४३,९३६ कर्जदारांना तारण व बिगर तारण कर्ज वितरित केले आहे. सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या कार्यरत असून, पोलिस अधिक्षक व निबंधक हे त्याचे सदस्य असल्याचे सांगितले..मात्र या यंत्रणा कमी पडत असल्याचे खोडके यांनी निदर्शनास आणले. यावेळी झालेल्या चर्चेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी शेतकऱ्यांना मूत्रपिंड विकण्याची वेळ येत असल्याचे सांगत सावकारांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी सरकारची ठोस भूमिका काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सहकारमंत्री पाटील यांनी त्यावर उत्तर देताना, अमरावती जिल्ह्यात कलम १७ व २६ अंतर्गत ३८३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २६६ तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही..मात्र ३४ प्रकरणांमध्ये अवैध सावकारी सिद्ध झाली असून संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांत ४८ जण आरोपी आहेत, असे उत्तर त्यांनी दिले. सावकारीचा प्रश्न राज्याला भेडसावत असून सध्या कार्यरत १२ हजार २११ परवानाधारक सावकारांनी डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत १,२८७.९३ कोटी रुपयांचे शेती व बिगरशेती कर्ज वितरित केलेले असल्याची माहिती त्यांनी दिली..तसेच सहकारी बँकांसह अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची लूट होत असून सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. यास उत्तर देताना बाबासाहेब पाटील यांनी, सावकारी नियमन कायदा २०१४ नुसार शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर वार्षिक नऊ टक्के, बिगर तारण कर्जावर १२ टक्के व्याज आकारण्याची मर्यादा निश्चित केली असल्याचे सांगितले.शिवाय शेतीबाह्य तारण कर्जावर १५ टक्के, तर बिगर तारण कर्जावर १८ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला. परवानाधारक सावकारांनी कार्यालयाबाहेर परवान्याचा फलक लावणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले..वडेट्टीवार यांचा आरोपसावकारी कर्जांत ४०० कोटी रुपयांची वाढ हीच अवैध सावकारी वाढल्याची सरकारी कबुली असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार केला. आमदार हरीश पिंपळे यांनी विनापरवानाधारक सावकार कोणताही लेखाजोखा न ठेवता चिठ्ठीवर कर्ज देतात आणि अवाजवी व्याज वसूल करतात, असा मुद्दा मांडला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अवैध सावकारीविरोधात हेल्पलाइन सुरू करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली..सिबिल स्कोरबाबत सूचनाराज्यातील अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना कर्जासाठी सिबिल स्कोरची विचारणा केली जात असल्याची तक्रार आमदार कैलास पाटील यांनी यावेळी केली. यावर उत्तर देताना मंत्री पाटील यांनी सांगितले की, राज्यातील सर्व बँकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून शेतीसंदर्भातील कर्जासाठी सिबिल स्कोर न तपासण्याची सूचना करण्यात आली आहे..राज्यातील स्थिती (२०२५)१२ हजार २११ - परवानाधारक सावकार५,५४,९५० - कर्जदार१,२८७.९३ - कोटी कर्ज डिसेंबरअखेरपर्यंत वितरित.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.