लोककलावंतांच्या मानधनासाठी आनंद शिंदे सरसावले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र


मुंबई ः लॉकडाऊनमुळे राज्यातील गोंधळी, वासुदेव आदी सुमारे चाळीस हजार लोककलावंतांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने सरकारने त्यांना किमान मानधन द्यावे, अशी मागणी गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांनी केली आहे. 

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने लादलेला लॉकडाऊन राज्यातील सारे लोककलावंत पाळत आहेत. मात्र, त्यामुळे राज्यातील पुजारी, गोंधळी, वासुदेव आदींपासून ते ढोल-लेझीम व बँजो कलावंतांसमोर मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. राज्याला लावणी, भारूड, वग, लोकसंगीत, तमाशा, जागरण, गोंधळ आदी कला सादर करणाऱ्या कलावंतांची परंपरा आहे. चैत्र महिन्यापासून गावागावांमध्ये जत्रा सुरू होतात. शिवजयंती आणि आंबेडकर जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम आणि लग्न समारंभात लोककलावंत कला सादर करून उदरनिर्वाह करतात. त्या मानधनावरच वर्षभर त्यांचे घर चालते. मात्र आता जत्रेतील कार्यक्रमांचे बुकिंग रद्द झाल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा कलावंतांना व त्यांच्या सहकाऱ्यांना सरकारने किमान आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी आनंद शिंदे यांनी केली आहे. 

हे वाचलं का? : लॉकडाऊनमध्येही अतिहुशारी... 31 हजार गाड्या जप्त, दोन कोटींचा दंड

मुख्यमंत्र्यांना साकडे

बहुतेक कलावंत विमुक्त व भटक्या जमातीचे असल्याने त्यांच्याकडे रेशनकार्ड नसते. बऱ्याच जणांकडे पक्के घरही नसते. तुळजापूर, गाणगापूर, जेजुरी, कोल्हापूर आदी देवळे बंद असल्याने कलावंत मंडळी जागेवरच बसून आहेत. त्यामुळे त्यांना खर्चासाठी सरकारने मानधन द्यावे, अशी मागणी लोककलावंतांचे प्रश्न मांडणारे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com