कोरोनाच्या सुरुवातीला झालेली चूक टाळण्यासाठी पालिकेकडून सक्तीचे निर्णय

कोरोनाच्या सुरुवातीला झालेली चूक टाळण्यासाठी पालिकेकडून सक्तीचे निर्णय

मुंबई: इंग्लंडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर राज्य सरकारसह महापालिकेने सक्त पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळात झालेल्या चुका हे मुख्य कारण आहे. 1 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात परदेशातून आलेल्या प्रवाशांवर कोणतीही बंधने नसल्याने मुंबई, महाराष्ट्रासह भारतात कोविड वाढला. यातून धडा घेत आता नव्या कोविडशी लढण्यासाठी सर्वच यंत्रणा ॲक्शनमोड मध्ये आल्या आहेत.

फेब्रुवारी मार्च काळात परदेशातून 2 लाख प्रवासी मुंबईत आले. त्यांच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पसरला.त्यामुळे आता खबरदारी घेत आहोत, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.

मुंबईसह भारतातील सर्व विमानतळावर 18 जानेवारीपासून चीन तसेच त्या परिसरातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येत होती. त्यात टप्प्याटप्प्याने काही देशांची संख्या वाढविण्यात आली. मात्र 9 मार्च रोजी राज्यात पहिला कोविड रुग्ण आढळला. हे कुटूंब आखाती देशातून आले होते. तर मुंबईत आढळेला पहिला रुग्णही याच प्रवाशां बरोबर आला होता. त्यानंतर राज्य सरकारने आखाती देशातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्याचीही परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र परवानगी देण्यात आली. तसेच काही परदेशातून आलेल्या देशातील इतर विमानतळांवर उतरून मुंबईतील आंतरदेशी विमानतळावर येत होते. सुरुवातीला आंतरदेशी विमानतळावरही प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जात नव्हते.

--------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Strict decision bmc avoid mistake made beginning of the corona

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com