ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश

ठाणे शहरात दिवसाला 60 जणांना श्‍वानदंश

ठाणे : महापालिकेकडून भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण केले जाते; पण पाच वर्षांहून अधिक काळ ही प्रक्रिया सुरू असूनही शहरातील भटक्‍या कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात पोचल्याने निर्बीजीकरणाबाबत शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दिवसाला सरासरी 60 जणांना भटका कुत्रा चावण्याच्या घटना घडत आहेत. 

उल्हासनगरमध्ये कुत्र्याने सात मुलांना चावा घेतल्यानंतर भटक्‍या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत; मात्र पालिका रुग्णालयात उपचार घेतले तरच पालिकेकडे याची नोंद होते. या नोंदीनुसार दिवसाला केवळ पाच जणांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्याचा दावा केला जात आहे; पण प्रत्यक्षात हा आकडा 60 आहे, असा दावा या विषयावर पाठपुरावा करणारे दक्ष नागरिक सत्यजित शहा यांनी केला आहे. ठाण्यातील महागिरी कोळीवाड्यातील भारती कुटुंबीयांनी तर भटक्‍या कुत्र्यांचा धसकाच घेतला आहे. गेल्या महिन्यात कुत्र्याने याच कुटुंबातील आर्यन (वय 10) याच्या पाठीचा चावा घेतला. तेव्हापासून आर्यनच्या मनात कुत्र्यांची भीती कायम आहे, असे शहा यांनी सांगितले. भटक्‍या कुत्र्यांचे लहान मुलांवरील हल्ले वाढले आहेत. श्‍वानदंशाच्या घटनांपैकी 80 टक्के घटनांमध्ये तीन ते आठ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे शहा यांनी सांगितले. 

एक लाख भटकी कुत्री 

ठाणे शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या सुमारे एक लाखापर्यंत असावी, असा अंदाज शहा यांनी वर्तवला आहे. कारण महापालिकेच्या दाव्यानुसार अद्याप शहरात 40 हजार भटकी कुत्री आहेत; मात्र त्याच वेळी दीड वर्षापासून कुत्र्यांचे सर्वेक्षण झालेले नसल्याने भटक्‍या कुत्र्यांची निश्‍चित संख्या सांगणे पालिका प्रशासनाला शक्‍य झालेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com