
Thane News : केंद्रीय पर्यावरण हवामान बदल व मंत्रालयातर्फे आज स्वच्छ हवा सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात पहिल्या क्रमांकावर इंदूर शहराने आपले स्थान कायम राखले असून तिसरा क्रमांक ठाण्याने पटकावला आहे. आग्रा शहर दुसऱ्या स्थानावर आहे. पुरस्कारांमध्ये अमरावती शहराचाही समावेश आहे.
केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. त्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये पहिला क्रमांक मध्य प्रदेशच्या इंदूर शहराला मिळाला आहे. तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत अमरावतीला पहिले स्थान मिळाले आहे.
मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि भूपेंद्र यादव यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना ५० लाख रुपयांचे पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन पुरस्कार प्रदान केला.
केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागांतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी १३१ शहरांची निवड करण्यात आली. प्रत्येक गटातील तीन सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांना रोख पारितोषिके देण्यात आली. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यमापन करून क्रमांक देण्यात आले. २०० गुणांपैकी १८५.२ गुण मिळवून ठाणे शहराने देशात तिसरा क्रमांक पटकावला. इंदूरने १८७ आणि आग्रा शहराने १८६ गुण मिळवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.