

Thane district hospital Waste
ESakal
ठाणे शहर : ठाणे जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण आदिवासी पाड्यातील नागरिक चांगल्या उपचाराकरिता ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र हे रुग्णालय सध्या कचऱ्याच्या उकिरड्याचे ठिकाण बनले आहे. रुग्ण उपचार घेत असलेल्या परिसरात वापरलेले हातमोजे आणि महिला रुग्णांचे पॅड उघड्यावर टाकले जात आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी असलेली स्वच्छतागृहेदेखील अस्वच्छ असल्याने ती आजार पसरवणारी ठिकाणे बनली आहेत.