पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.
पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; देवेंद्र फडणवीस
Summary

फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबई : राज्यभरात गाजत असलेल्या म्हाडा(mada), आरोग्य विभाग(health department), शिक्षक पात्रता परीक्षा (tet) या परीक्षांच्या पेपर फुटीचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचा आरोप करत या गैरव्यवहाराची चौकशी ‘सीबीआय’मार्फत व्हावी. यासाठी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी आज विधानसभेत केला.

पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; देवेंद्र फडणवीस
'सतर्क आणि सावधान! मोदींच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

विरोधी पक्षाने दिलेल्या नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या (mahavikas aghadi government)दोन वर्षाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. पेपरफुटीच्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, परीक्षा घेणाऱ्या कंपन्या मुळातच अपात्र आणि काळ्या यादीत टाकलेल्या होत्या. तरीही त्याच कंपन्यांना परीक्षाची कंत्राटे दिली. एवढेच नव्हे तर ‘टीईटी’(tet)च्या गैरप्रकारात तर मंत्र्यांचे काही निकटवर्तीयांचाच समावेश आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला तरी त्यांचे हात लवकरच बांधले जाणार आहेत, असा दावाही फडणवीस यांनी केला.

या गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीच व्हायला हवी, अशी मागणी करतानाच जर सरकारने मागणी मान्य केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात नोकरभरती प्रक्रिया आणि परीक्षात सावळागोंधळ सुरू आहे. कुंपणच शेत खात आहे. अपात्र ठरलेल्या न्यासा कंपनीलाच कंत्राट कसे मिळाले असा सवालही फडणवीस यांनी केला.

पेपर फुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी न्यायालयात जाणार; देवेंद्र फडणवीस
अकोला : पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, गणेशविसर्जनावेळी सतर्क राहण्याच्या सूचना

मराठवाडा, विदर्भावर अन्याय फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीकडून मराठवाडा, विदर्भावर अन्याय करत आहे. मराठवाडा आणि विदर्भाची हक्काची वैधानिक विकास महामंडळे रद्द केली आहेत. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या हक्काचा निधी पळविला जात आहे.

बाळासाहेबांना वेदना होत असतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत, असे सांगत फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यावरच निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री सध्या आजारपणामुळे सभागृहात नसले तरी राज्याची आजची अवस्था पाहून स्वर्गात बाळासाहेबांनाही वेदना होत असतील. राज्यात सरकारचे कुठेही अस्तित्व उरलेले नाही. प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com