

Maharashtra monkey capture reward
ESakal
राज्यातील वाढता मानव-वानर संघर्ष रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. वनविभागाने २२ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, माकडांना सुरक्षितपणे पकडण्यासाठी ६०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून पूर्वीच्या आर्थिक निकषांमध्ये ही सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी माकडांना पकडण्यासाठी ३०० रुपये दिले जात होते, परंतु आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे.