ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी

भारतरत्नसाठी विद्यार्थिनींची स्वाक्षरी मोहीम घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, या मागणीसाठी आज साकीनाका येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वाक्षरी मोहीम राबवली. संचालक राजेश सुभेदार आणि मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्यात आली. अनेक वर्षे सामाजिक संस्था, संघटना व महिला सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. चूल आणि मूलपर्यंतच मर्यादित असलेल्या मुलींना व महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप हाल सोसले. त्यामुळे भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, या मागणीसाठी आज ४ थी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनींनी कपाळाला आडवी पट्टी लावून सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा साकारली. तसेच अडीचशेहून अधिक मुलींनी स्वाक्षरी करून भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी मागणी केली. या स्वाक्षऱ्या आम्ही पंतप्रधान व राष्ट्रपती कार्यालयांना पाठविणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती सुभेदार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com